

पुणे : प्रतिनिधी
शेततळ्यांमध्ये पडून जीवितहानीच्या घटना टाळण्यासाठी कृषी विभागातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून त्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
प्रत्येक शेततळ्यामध्ये त्याच्या आकारमानानुसार जलतरण तलावात वापरण्यात येणाऱ्या ट्युब ठेवाव्यात. शेततळ्याच्या चहुबाजूंनी गाठी मारलेले दोरखंड ठेवण्यात यावेत. शेततळ्यांमध्ये दोरखंडाची चौकोनी जाळी प्लॅस्टिक कागदाच्या उतारावर लावण्यात यावी. शेततळ्याच्या वरील चारही बाजूंना लाईफ जॅकेट बसविण्यात यावे. शेतकऱ्यांनी शेततळ्याला कुंपण करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.ज