Spread the love

जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही राज्य सरकार करणार

तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल(साकव पुल) रविवार दिनांक १५जुन २०२५ रोजी दुपारच्या वेळेस कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून.५१ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जुन्या पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. तसेच या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना पर्यटन स्थळी विशेषतः सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी. अशा देखील सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखाची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींचा उपचार खर्चही राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी देखील शोक व्यक्त केला असून. मदत कार्यात राज्य सरकारला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांनी दिले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *